राज्यात अतिवृष्टी, मुसळधार पावसाचा अंदाज ;पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना नवा हवामान अंदाज देखील समोर आला आहे.

‘आठ जूनपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील ज्या भागात पुरेसा पाऊस पडलेला नाही, पावसापासून वंचित आहे, त्या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नंदूरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव, बुलढाणा, अमरावती, जालना या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तर उर्वरीत जे जिल्हे आहेत, सातारा जिल्हा,सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव, जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिगोंली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, त्यानंतर वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles