भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते संपन्न होणार
अहिल्यानगर : मार्केट यार्ड चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक 10 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे, दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नगरमध्ये बसवण्यात येत आहे, हा देशातील दुसरा पुतळा आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली
यावेळी जेष्ठ नेते संभाजी भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुनील क्षेत्रे, सुनील शिंदे, सुमित गायकवाड, किरण दाभाडे, प्रशांत गायकवाड, कौशल्य गायकवाड आदी उपस्थित होते.
संविधानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी होत असतो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास मदत होत असून शहराच्या वैभवात देखील भर पडत आहे, घटनेची सुरक्षा देखील राखली जाईल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत असून त्याचा चौथारा १८ फूट उंचीचा असून त्यावरती १० फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.


