Thursday, March 12, 2026

नगर जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

मोबाईल ॲप्लीकेशन स्वच्छ व सुजल गावासाठी सरपंच संवाद

संवादाचे माध्यम निर्माण करणारा उपक्रम- आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर

अहिल्यानगर – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत गावे हागणदारीमुक्त ठेवून त्यांना अधिक आदर्श आणि टिकाऊ बनविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामपातळीवरील जनसहभाग वाढवण्यासाठी सरपंच संवाद हे नाविन्यपूर्ण मोबाईल ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे, असे
आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आनंद भंडारी यांनी केले आहे.

सरपंच संवाद हे ॲप्लिकेशन केंद्र शासनाच्या वतीने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. या गावातील स्वच्छता व ग्रामविकासाचे उपक्रम पोस्ट स्वरूपात शेअर करू शकतात. तसेच इतर गावांतील उत्तम कामांची उदाहरणे पाहता येतात, ॲपव्दारे सरपंच यांना
विषयानुसार संवाद साधता येतो, पाणी व स्वच्छता विषयक बातम्या व यशोगाथा मिळता येतात, तसेच प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्रही प्राप्त करता येते. हा उपक्रम सरपंचांना प्रेरणा देणारा संवादाचे नवे व्यासपीठ असून, ग्रामपातळीवरील सर्वांगीण, शाश्वत आणि लोकसहभागातून होणाऱ्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.qci.sarpanch_samvaad
सर्व सरपंचांनी सदरचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्याचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन व जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles