२०१७च्या जनगणनेशी संबंधित १० महत्त्वाच्या गोष्टी
१) या जनगणनेत सर्वेक्षण दोन टप्प्यात होणार असून ३४ लाख सर्वेक्षक घरोघरी, शेतात जाऊन माहिती गोळा करतील.
२) याशिवाय १.३ लाख जनगणना अधिकारी तैनात केले जातील. हे सर्व कर्मचारी जनगणनेसाठी क्षेत्रीय सर्वेक्षणाचे काम करतील. याचा संपूर्ण विदा तयार केला जाईल. या अंतर्गत जातीनिहाय प्रश्नही विचारले जातील.
३) जनगणना डिजिटल पद्धतीने केली जाईल. यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन वापरण्यात येणार आहे.
४) मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेत पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची मोजणी केली जाईल.
५) यामध्ये प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांबद्दल माहिती गोळा केली जाईल.
६) जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्या शास्त्रीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि इतर माहिती गोळा केली जाईल.
७) या जनगणनेत जातीय जनगणना देखील केली जाईल .जनगणना प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही सोळावी जनगणना आहे, आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे.
८) लोकांना स्वगणनेची तरतुदही उपलब्ध करून दिले जाईल.
९) जनगणनेशी संबंधित सर्व डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली जाईल.
१०) यामध्ये जनगणनेसाठी डेटा गोळा करणे, हस्तांतरित करणे आणि साठवणे तसेच प्रत्येक टप्प्यावर डेटाची गळती होऊ नये यासाठी कठोर व्यवस्था करण्यात येणार आहे.


