लाडक्या बहिणींनंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता पगारासाठी ईकेवायसी करावे लागणार आहे. राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पगार मिळवण्यासाठी ईकेवायसी करावीच लागणार आहे. राज्यात जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी आहे. या प्रत्येक कर्मचाऱ्यांना ईकेवायसी करावी लागणार आहे. ईकेवायसी केल्यानंतर पुढच्या महिन्याचा पगार मिळणार आहे. वित्त विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहेत. पगार देताना कोणताही गैरप्रकार होऊ नये, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दुबार वेतन दिले जाऊ नये, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना ईकेवायसीसाठी सेवार्थ प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे अकाउंट नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड अशी सर्व माहिती लिहलेली आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांची दुबार नोंद आढळली. त्यानंतर सरकारनेहा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना ईकेवायसी करण्यास सांगितले आहे. ईकेवायसी न केल्यास कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचा पगार दिला जाणार नाही.कर्मचाऱ्यांची ईकेवायसीअंतर्गत नव्याने नोंद होणार आहे. ईकेवायसी करण्याआधी आधार आणि बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्ही जर हे काम केले नसेल तर लगेच करा. याचसोबत प्रत्येक कर्मचाऱ्याला ईकेवायसी पूर्ण करुन त्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्याची सेवार्थ प्रणालीत ईकेवायासीनुसार नोंद केली जाणार आहे. यानंतरच तुम्ही दिलेले बँक खाते आणि सेवार्थ प्रणालीतील बँक खाते सारखे असेल तर पुढे वेतन मिळणार आहे.


