लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी;लाभार्थी महिलांची ती इच्छा अखेर पूर्ण, तटकरेंनी सांगितली २ कारणे

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकीच्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आलीये. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसीतील चुका सुधारण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परंतु सरकारने लाडकींना शेवटची संधी दिली आहे. लाडक्या बहि‍णींच्या मागणीनंतर निर्णय घेतल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत ३१ मार्चपर्यंत केली होती. तरीही काही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी eKYC केली नव्हती. या महिलांनी लेखी पत्र देत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे eKYCची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ई-केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने हजारो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी e-KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती’.

तत्पूर्वी, काही लाडक्या बहि‍णींनी ईकेवायसी करताना काही चुका केल्या होत्या. लाभार्थ्यांना त्या चुका दुरूस्त करण्याची संधी आहे. या लाभार्थी महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसी करावी लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles