Sunday, December 14, 2025

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नागपुरात धरणे आंदोलन

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आज नागपुरात धरणे आंदोलन व मोर्चा; सेवा नियमितीकरणासह नऊ मागण्या सरकारसमोर
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कंत्राटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य आज (शुक्रवार, 12 डिसेंबर 2025) सकाळी 10 वाजता नागपूर येथे धरणे आंदोलन व मोर्चा काढत सरकारविरोधात आक्रमक होणार आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद गंगाधर आमले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी संघटनेने शासनाकडे नऊ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. ग्रामविकास विभागामार्फत नियुक्त सीएससी-ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड, दिल्ली यांच्या अनियमित नियुक्ती व कामकाजाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
संघटनेच्या मुख्य मागण्या :

सीएससी-ई-गव्हर्नन्सची नियमबाह्य नियुक्ती रद्द करून पूर्वीप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत नियुक्ती करावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या धर्तीवर ग्राम स्वराज अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करावी.
सीएससी कंपनीकडून सतत पिळवणूक होत असल्याची तक्रार असून,
याबाबत मुख्यमंत्री कार्यालय व विभागीय पातळीवर केलेल्या पत्रव्यवहारानंतरही कारवाई न झाल्याची खंत.
शासन निर्णयानुसार मानधनाची अंमलबजावणी न केल्याचा आरोप, कर्मचारीरांना योग्य मानधन देण्याची मागणी.
repeated तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे सीएससी कंपनीवर गुन्हा नोंदवून दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी.
चुकीच्या पद्धतीने झालेल्या कपाती व्याजासह परत करण्याची मागणी.
भरती प्रक्रिया व मानधन अदा करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.
अतिरिक कामाचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.
ग्रामसभा मोबिलायझर यांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व त्यानुसार मानधन देण्यात यावे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान हे आंदोलन जोरदार होण्याची शक्यता असून शासनाने या मागण्यांवर भूमिका स्पष्ट करावी, अशी संघटनेची भूमिका आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles