Tuesday, October 28, 2025

बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडलेला होता. त्यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.

1984-95 बुऱ्हानगर ता. नगर सरपंच.
1990 बानेश्वर शैक्षणिक संस्था स्थापना.
1995 नगर -नेवासा अपक्ष आमदार.
1999 नगर – नेवासा अपक्ष आमदार.
2003-04 राज्यमंत्री, मत्स्य व बंदरे विकास
2004 राष्ट्रवादी , नगर- नेवासा आमदार
2007 अहिल्यानगर जिल्हा बँक संचालक.
2008-09 अहिल्यानगर जिल्हा बँक चेअरमन.
2009 नगर दक्षिण खासदार राष्ट्रवादी उमेदवारी पराभव.
2009 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी आमदार.
2014 भाजप राहुरी नगर पाथर्डी आमदार
2019 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव.
2023 चेअरमन अहिल्यानगर जिल्हा बँक.
2024 भाजप राहुरी- नगर- पाथर्डी

शिवाजीराव कर्डिले यांची अंत्ययात्रा आज दुपारी तीन वाजता राहत्या घरापासून निघणार आहे बुऱ्हानगरमध्ये
अंत्यविधी होणार आहे

रोहित पवारांकडून श्रद्धांजली

कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण करत रोहित पवार म्हणाले, शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्व श्रद्धांजली!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles