राज्य शासनाने जिल्हा परीषदेच्या ‘क’ व ‘ड’ वर्ग कर्मचार्यांच्या बदल्याचे सुधारीत धोरण निश्चित केले आहे. या बदल्यांमधून शिक्षक संवर्ग वगळण्यात आला आहे. त्यानुसार 2026 मध्ये सर्वसाधारण बदल्या शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे. 6 एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 4 मे रोजी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सोमवारी (6 एप्रिल) काढले आहे.
6 ते 10 एप्रिलपर्यंत प्रशासकीय व विनंती बदली अर्ज सादर करणे, 13 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जानुसार बदल्याची माहिती एकत्रित करून त्या-त्या विभागाकडे सादर करणे, 17 एप्रिल रोजी संवर्गनिहाय कर्मचारी तात्पुरती प्रारूप वास्तव्य ज्येष्ठता याद्या प्रसिध्द करणे, 24 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हरकती नोदविणे, 27 एप्रिल रोजी हरकतींची पडताळणी करणे व 4 मे रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
प्रशासकीय व विंनती बदल्यातून सुट किंवा प्राधान्य क्रमात मोडणारे सर्व संबंधित कर्मचारी यांच्या बाबतीत त्यांनी सादर केलेले पुराव्यांची कार्यालय प्रमुखांनी पडताळणी करणे. या बदल्या दरम्यान कोणतीही चुक किंवा अनियमितता होणार नाही याची काळजी खातेप्रमुखांनी द्यावी असे स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी दिले आहेत.


