Sunday, December 7, 2025

अहिल्यानगर जिल्ह्यात शालेय बसचा घाटात भीषण अपघात; विद्यार्थ्यांसह बस थेट खड्ड्यात कोसळली

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला असून संगमनेर तालुयातील चंदनापूरी घाटातील ही घटना घडली आहे. या अपघातग्रस्त बसमध्ये ३५ हून अधिक विद्यार्थी होते. या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अहिल्यानगरच्या संगमनेर तालुयातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून विद्यार्थी घेऊन तीन बस जात असतात. रोज प्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन बस मार्गस्थ झाल्या होत्या. यात आज सकाळी एक बस ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी गावाकडे निघाली होती. या बसला अपघात झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या गटारमध्ये बस पलटी झाली आहे.

चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी
दरम्यान सध्या पुणे- नाशिक महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. अशातच या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.यातच स्कूल बसला समोरून येणार्‍या वाहनाने हुलकावणी दिल्याने स्कूल बस चालकाचा ताबा सुटला.यानंतर बस चंदनापुरी घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईट गटारात पलटी झाली. यामुळे बसमध्ये असलेल्या विद्यार्थी जखमी झाले आहेत.

जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. सध्या जखमी विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल केलं असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. पालकांना घटनेची माहिती समजतात त्यांनी रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles