काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आणि त्यांनी देशातील संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली होती. शिवराज पाटील हे लातूरमधील चाकूर येथील प्रभावी काँग्रेस नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून ७ वेळा विजय मिळवला होता.

शिवराज पााटील चाकूरकर हे २००४ मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. काँग्रेस आणि त्यांच्या संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत शोकसंवेदना व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles