Thursday, February 19, 2026

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ – मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ – मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
घोगरगाव (ता. श्रीगोंदा) : रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे माजी विद्यार्थी संघटना नोंदणी प्रक्रियेच्या उद्देशाने आयोजित सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. सभेला विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सभेच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी आणि अधिक व्यापक करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शाळेने दिलेल्या संस्कारांची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ असून, संघटनेच्या माध्यमातून आपण विद्यालयाच्या प्रगतीत थेट योगदान देऊ शकतो,” असे ते म्हणाले.
प्राचार्य श्री. वसंत नरवडे यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेमागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, माजी विद्यार्थ्यांचे विद्यालयाशी आपुलकीचे स्नेहबंध कायम राहावेत, हीच या उपक्रमाची मूलभूत भूमिका आहे. विद्यालयाच्या आर्थिक बळकटी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, वैचारिक समृद्धी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यासाठी संघटना प्रभावी व्यासपीठ ठरेल. संतुलित विकास साधत शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या सहविचार सभेस सरपंच सुजाता भोसले, उपसरपंच डॉ. दिलीप भोस, राजेंद्र उगले, बिभीषण उगले, सेवानिवृत्त प्राचार्य अविनाश गांगर्डे, अर्जुन उगले गुरुजी, पत्रकार उज्वलाताई उल्हारे, डॉ. सुधीर गुंजाळ, दिलीप जाधव, भगवान साळुंके, कृषी सहाय्यक मिलिंद भोसले, समीर शेख गुरुजी, आदिक उगले, महेश बोरुडे, प्रवीण लुणिया, आदिल शेख आदी मान्यवर माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघटनेची अधिकृत स्थापना व नोंदणी करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. लवकरच कार्यकारिणी जाहीर करून पुढील कार्ययोजना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यालयाच्या सर्वांगीण विकासाला नवसंजीवनी मिळून आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक व सुरक्षा या सर्व बाबींमध्ये संतुलित प्रगती साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles