भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

बीड जिल्ह्यातील जायकवाडी भूसंपादन घोटाळयात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात भूसंपादनाच्या कामात बनावट सह्या वापरुन जुन्या तारखेत भूसंपादनाचे सुमारे ७२ कोटी रुपये अदा करण्यात आले होते. तर सुमारे २४१ कोटी ६२ रुपयांचे घोटाळा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणात अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीचे नमुनेही तपासणीस पाठविले होते. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील या भूसंपादन घोटाळ्यात काही कर्मचाऱ्यांचे व्हॉटस् ॲप वरील संभाषण आणि बनावट सह्यांचे नमुने गोळा करुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात अविनाश पाठक यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक केल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे सध्या रजेवर आहेत. अतिरिक्त पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी अविनाश पाठक यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात पूर्वी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास एम व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाााली सुरू होता.
बीड जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी बिडमध्ये गुन्हा दाखल झाला होता.बीड मधील वरिष्ठ भूसंपादन कार्यालयाच्या १५४ प्रकरणात जवळपास २४१ कोटी ६२ लक्ष रुपये वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश तयार करण्यात आले होते . या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एक विशेष तपास स्थापन करण्यात आली होती. या पथकाने बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या चौकशी समिती पुढे हजर झाले .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles