सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी दिली तर थेट कारवाई… ‘झिरो टॉलरन्स’ धोरण!

आगामी बकरी ईद शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून साजरी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. “बकरी ईदच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत रस्ते अडवून नमाज पठण करता येणार नाही,” असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी एका उच्चस्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेताना त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीत केवळ सण-उत्सवांची तयारीच नाही, तर जनतेच्या तक्रारींचे निवारण, गंगा दसरा आणि बेकायदेशीर कामांविरोधातील कारवाई अशा अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

सण साजरा करताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत:

कुर्बानीनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची आणि अवशेषांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली पाहिजे.
उघड्यावर मांस विक्री करण्यास सक्त मनाई असेल. तसेच, बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कडक कारवाई केली जाईल. अधिकृत कत्तलखान्यांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त प्राणी ठेवता येणार नाहीत.

अलिगड, बिजनोर, सहारनपूर, रामपूर आणि संभल या संवेदनशील जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी जुन्या घटनांचा अभ्यास करून संभाव्य समाजकंटकांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles