onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -30-05–2026 एकुण कांदा गोणी -43,024
लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 1200 ते 1500
2.नंबर= 800 ते 1200
3 नंबर= 400 ते 800

4 नंबर= 150 ते 400

————————————————————————————————————————————————–

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या मूल्यांकन प्रक्रियेत वाघोली ग्रामपंचायतीवर अन्याय झाल्याचा आरोप करत, शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांनी शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयासमोर थेट मुंडन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासन आणि शासनाचा तीव्र निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शेवगाव पंचायत समिती परिसरात काही काळ कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

वाघोली ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शासनाने निश्चित केलेल्या विविध निकषांनुसार ग्रामविकास, लोकसहभाग, श्रमदान, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, स्वच्छता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यापूव गावाला माझी वसुंधरा अभियान 0.2/0.3 अंतर्गत प्रथम पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यामुळे एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असतानाही, समृद्ध पंचायतराज अभियानाच्या मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नाही आणि वाघोलीवर अन्याय करण्यात आला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीचे निकषनिहाय गुणांकन तातडीने जाहीर करावे. मूल्यांकन समितीचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल (विझिट रिपोर्ट) उपलब्ध करून द्यावा. संपूर्ण प्रकरणाचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

या आंदोलनाला वाघोली परिसरातील विविध गावांच्या सरपंचांनीही उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी आंदोलनस्थळी येत ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. हे आंदोलन भाजप कार्यकर्ते उमेश भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी उमेश भालसिंग यांनी स्वतःही मुंडन करून घेतले.

पुरस्कारासाठी लाखो रुपयांची मागणी ः भालसिंग
आंदोलनादरम्यान वाघोलीच्या सरपंच सुश्मिता भालसिंग यांचे पती व भाजप कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी थेट निरीक्षक समितीवरच लाचखोरीचे गंभीर आरोप केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पुरस्कारासाठी गावात आलेल्या निरीक्षक समितीच्या काही प्रतिनिधींनी पुरस्कारासाठी लाखो रुपयांची आर्थिक मागणी केली होती. आम्ही ही लाचेची रक्कम देणे नाकारल्यामुळेच हा पुरस्कार जाणीवपूर्वक दुसऱ्या गावाला वळविण्यात आला आहे. या आरोपांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles