‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा वीरपुत्रांच्या सन्मानाबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये दिशाभूल करणारे वृत्त समोर आले होते. या शहीदांचे बलिदान नुकतेच समोर आले असल्याचा दावा या वृत्तांमध्ये करण्यात आला होता. मात्र, भारतीय लष्कराने अधिकृत पत्रक जारी करत हा दावा पूर्णपणे फेटाळला असून, या शहीदांचा सन्मान योग्य वेळी आणि अत्यंत आदराने करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
माध्यमांमध्ये पसरत असलेल्या या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसून, यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी चिंता लष्कराने व्यक्त केली आहे.
११ मे २०२५: तत्कालीन लष्करी मोहीम महासंचालकांनी (DGMO) एका अधिकृत पत्रकार परिषदेत या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली होती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मधील त्यांच्या शौर्याचा विशेष उल्लेख केला होता.
१४ ऑगस्ट २०२५: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या वीरांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, ज्याची अधिकृत माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देशासमोर आणली गेली.
८ ऑक्टोबर २०२५: हवाई दल प्रमुखांच्या हस्ते एका विशेष समारंभात शहीदांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला होता.
१५ जानेवारी २०२६: जयपूर येथे झालेल्या ‘लष्कर दिन’ संचलनादरम्यान लष्करप्रमुखांनी यातील तीन वीर जवानांच्या कुटुंबीयांना ‘सेना पदक’ (शौर्य) प्रदान केले.
याशिवाय, भारतीय लष्कराच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरूनही या शहीदांना तातडीने आदरांजली वाहण्यात आली होती.
माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरील काही प्लॅटफॉर्म्सवर असा चुकीचा (दिशाभूल करणारा) दावा केला जात आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा वीर सैनिकांना नुकतीच पहिल्यांदाच अधिकृत मान्यता देण्यात आली किंवा त्यांचे बलिदान पहिल्यांदाच समोर आणले गेले. हा दावा अजिबात खरा नाही.


