शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी;सर्पदंशावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय,आमदार विक्रम पाचपुते म्हणाले..

महाराष्ट्रात सर्पदंशाच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात समोर येतात. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथी आदिवासी आश्रम शाळेत जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थींनीना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. त्यात तीन विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर आता सरकारने राज्यातील आदिवासी, शेतमजूर आणि शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’मध्ये समावेश करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सर्पदंशाच्या प्रकरणात मृत्यूचा आकडा कमी करण्याचा मोठा प्रयत्न होणार आहे.
सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’मध्ये समावेश करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी याविषयीची मागणी केली होती. ती आरोग्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. 30 जून रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी आश्वासन दिले होते.

शेतात काम करताना, शाळेत, रस्त्याने जाताना, सर्पदंशाने विषबाधा होऊन ग्रामीण भागात अनेक जण दगावतात. पण सर्पदंशाची गणना आजारात करण्यात येत नव्हती. यामुळे बाधितांच्या नोंदी, तातडीचे उपाय, प्रतिबंधात्मक लस याविषयी सरकारने ठोस पावलं टाकली नव्हती. त्यानंतर आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून जाहीर करण्याची मागणी मी केली होती. तो निर्णय फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे. सर्पदंशामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. सर्पदंशावर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे हा मोठा निर्णय आहे. सर्पदंशानंतर व्यक्ती बरा झाला तरी त्यावर अनेक परिणाम दिसतात. त्यामुळे त्याचे देखील सर्वेक्षण केले जाणार आहे. अधिसूचित झाल्यामुळे मदत उपलब्ध होईल. काही प्रजाती चावल्यामुळे अर्धांगवायू होतो. कधीकधी अवयव काढावे लागतात. अधिसूचित आजारामुळे त्याचा समावेश होईल. सर्पदंशामुळे आजार झाला असेल तर आता फायदा होईल, असे भाजप आमदार विक्रम पाचपुते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles