शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, राज्यात एक योजना सुरू

राज्य सरकारने येत्या 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल, याची घोषणा केलेली आहे. त्या दृष्टीने आता कामही चालू झाले आहे. अधिकाऱ्यांनी या कर्जमाफीसाठी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी एका प्रकारे ही खुशखबरच असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. त्यांनी राज्यात एक योजना सुरू झाली असून या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होईल, असे सांगितले आहे.बळीराजा पांदण रस्ता योजना, असे बानकुळे यांनी सांगितलेल्या योजनचे नाव आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेमध्ये जे शेतरस्ते आहेत त्या रस्त्यांची मोजणी करणे, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आणि रस्ता हा वादमुक्त करून घेणे अशी कामे करण्यात येतील. ही जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल खात्याला दिलेली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले..

तसेच, या योजनेमुळे शेतकऱ्यांना बारमाही रस्ता उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना रस्ता मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दुबार पीक होणार नाही. शेतात पाणी, दिवसाला 12 तास वीज आणि शेतापर्यंत रस्ता पोहोचला तर शेतकऱ्यांचा पुत्र कधीही सरकारी नोकरी मागायला जाणार नाही असं बावनकुळे म्हणाले.ज्या शेतकऱ्यांनी 50 शेतकऱ्यांची वाहतूक अतिक्रमण करून थांबवली, त्या शेतकऱ्यांचे ॲग्री स्टॅक नंबर बंद केले जातील. जेणेकरून पुढचे पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते मोकळे करण्याची मोहीम सुरू झालेली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles