गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारताने श्रीलंकेचा १६५ रन्सने पराभव केला. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या २०६ धावांवर आटोपला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने फलंदाजी करत पहिल्या डावात 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. भारताने श्रीलंकेला 284 धावांवर रोखलं आणि 178 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फिरकीची जादू स्पष्ट दिसत होती. अशा स्थितीत भारताने सर्व गडी गमवून 193 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 371 धावा झाल्या. यासह श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवलं. श्रीलंकेचा संघ 206 धावा करू शकला. भारताने हा सामना 165 धावांनी जिंकला.
भारताकडून फिरकीपटू मानव सुथार कमाल केली. त्याने 23.4 षटकात 55 धावा देत 6 विकेट काढल्या. तर प्रसिद्ध कृष्णाच्या वाटेला 2 विकेट आल्या. तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र कुलदीप यादव आणि देवदत्त पडिक्कल यांना काही विकेट मिळाली नाही.


