अहिल्यानगर – पती-पत्नीत झालेल्या वादातून पतीने स्वतःच्या छातीवर चाकूने वार आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या आत्महत्येनंतर पत्नी किरण खरवाल यांनी देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अहिल्यानगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जोडपे मुळचे उत्तर प्रदेश येथील असल्याचे माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पती-पत्नीमध्ये नेमका कशावरून वाद झाला? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, राजेंद्र इंडस्ट्रीज जी-107 येथे बाथरूममध्ये एकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (16 जुलै) घडली. सुभाष मळु नेटके (50 रा. आनंद पार्क, मोरया पार्क जवळ, बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास, सुभाष नेटके यांनी राजेंद्र इंडस्ट्रीज जी-107 येथील बाथरूममध्ये गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच, त्यांचा मुलगा विकास सुभाष नेटके यांनी त्यांना तातडीने येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी यासंदर्भात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


