पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. १८ जुलै रोजी म्हणजेच आज याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील एका कार्यक्रमात याबाबत घोषणा करु शकतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत. परंतु या योजनेत काही शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीयेत. कोणत्या शेतकऱ्यांना आणि का पैसे मिळणार नाहीत याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.पीएम किसान योजनेत फक्त एका कुटुंबातील एकच शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. याचसोबत योजनेचे अनेक निकष आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, याचसोबत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहेत. याचसोबत शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. जर रजिस्ट्रेशनमध्ये काही कागदपत्रांमध्ये अडचणी असतील तर तुम्हाला पैसे येण्यास अडचणी येतील.
जर बँक अकाउंट किंवा नावात काही माहिती अर्धवट असेल तर अशा परिस्थितीत पैसे ट्रान्सफर करता येणार नाही. त्यामुळे याबाबतची माहिती आधी मिळवा.ई केवायसी करताना आधार कार्ड, पत्ता आणि बँक पासबुक आवश्यक आहे. CSC सेंटरमध्ये जाताना ही सर्व कागदपत्रे घेऊन जा.या योजनेतील केवायसी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा.


