लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला फडणवीस सरकार देणार मोठं गिफ्ट; थेट आदेशच काढला

राज्यात धर्मांतरासंदर्भातील नव्या कायद्याच्या अंमलबजवणीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026 येत्या 28 ऑगस्ट 2026 पासून राज्यभर लागू होणार आहे. याबाबत राज्याच्या गृह विभागाकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. गृह विभागाने 17 ऑगस्ट रोजी ही अधिसूचना जारी केली. Notification No. NAX-0724/C.R.240/Spl-1B नुसार महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026 मधील तरतुदी लागू करण्यासाठी 28 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी रक्षाबंधन असल्याने सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट देण्यात आले. राज्यपालांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने गृह विभागाचे उपसचिव प्रितमकुमार जावळे यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर तो अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आला. आता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपासून हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल.
बळजबरीच्या धर्मांतराला आळा घालण्याचा उद्देश

बळजबरी, फसवणूक, आमिष, खोटी माहिती किंवा लग्नाचे आश्वासन देऊन करण्यात येणारे धर्मांतर रोखणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये या कायद्यानुसार कारवाई करता येणार आहे.र जावळे यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाने मंजूर केला होता. त्यानंतर विधेयक राज्यपालांकडे आणि पुढे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे २८ ऑगस्टपासून राज्यातील बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याचा दणका बसणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles