कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा चौक येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून रस्ता रोको केल्याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान चिंचोली काळदात फाटा चौक येथे हे आंदोलन झाले. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करून श्रीगोंदा ते जामखेड आणि कर्जत ते मिरजगाव रस्त्यावरील वाहतूक अडवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांची अडचण झाली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी बळीराम गोपीनाथ काकडे यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांची मोठी प्रतिक्रिया म्हणाले…गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप म्हणाले…
“छत्रपतींच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले. जनतेच्या भावना रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रशासनाने दखल न घेतल्याने आम्हाला हा मार्ग पत्करावा लागला.


