Saturday, February 21, 2026

आता बाईकलाही टोल लागणार !१५ ऑगस्टपासून ‘या’ मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे?

नवी दिल्ली : भारत सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी एक नवीन टोल धोरण लागू केलं आहे. या धोरणानुसार, १५ ऑगस्ट २०२५ पासून, दुचाकी वाहनांना देखील राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरावा लागणार आहे.

यापूर्वी दुचाकींकडून टोल घेतला जात नव्हता. मात्र आता दुचाकीस्वारांनाही टोल द्यावा लागणार आहे. सरकारनं याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. नवीन नियमांनुसार, दुचाकी आणि दुचाकी चालकांना आता टोल प्लाझावर थांबून टोल कर भरावा लागेल. दुचाकीस्वारकांना किती टोल भरावा लागेल याची रक्कम अद्याप जाहीर केलेली नाही.

राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना १५ ऑगस्टपासून टोल भरावा लागणार आहे. जेव्हा दुचाकी खरेदी केली जाते तेव्हाच टोल कर वसूल केला जातो. त्यामुळे जेव्हा दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझामधून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल कर आकारला जात नव्हता. राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी किंवा त्यावरील वाहनांकडूनच टोल कर वसूल केला जात आहे. मात्र आता दुचाकीस्वारानांही टोल भरावा लागणार आहे. नवीन नियमानुसार, दुचाकींची फास्टटॅगद्वारे टोल भरावा लागेल. जो कोणी नियमाचे उल्लंघन करेल त्याला २००० रुपये दंड भरावा लागेल.

मात्र, याबाबत संपूर्ण चौकशी केली असता असा कोणतचं धोरण सरकारनं लागू केलेलं नाहीय. याबाबत रस्ते वाहतूक मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी ट्वीट (एक्स) करत याबाबत माहिती दिली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘काही प्रसार माध्यमांकडून दुचाकींवर टोल लागू झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याप्रमाणे असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीय. दुचाकींवर इथून पुढेही टोल माफ असरणार आहे’, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles