नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या एक्सिसमध्ये असताना…

नाशिकच्या आयटी हबमध्ये कार्पोरेट धर्मांतरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी देखील आपले मत मांडले आहे. कार्यालयाच्या ठिकाणी असे होते याचा आपल्याला देखील अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजकाल लव्ह जिहादची प्रकरणे खूप भयानक आहेत. त्यांच्यावर योग्य एक्शन झाली पाहिजेच आता आपल्या मुलींनी थोड अलर्ट राहाणे गरजेचे आहे.आपली संस्कृती फॉलो केली तर असे कधी होऊ शकत नाही असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

कार्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की मला खूप खराब वाटतं आणि खेद वाटत आहे की कॉर्पोरेट मध्ये हे होत आहे. माझ्या वेळेस जेव्हा मी ॲक्सिस बँकेत होती. तेव्हा अशा केसेस माझ्यापुढे झालेल्या आहेत.आणि व्हीसल ब्लोअरिंग होऊन त्या मुलांच्या अगेंस्ट ॲक्शन ही झालेली आहे. असा झाल्या झाल्या आपल्याला विसल ब्लोइंग करणं जरुरी, आपल्या सिनिअर्सना अस सांगणं जरूर आहे त्याच्यातूनच बदल होऊ शकतो असेही त्या यावेळी म्हणाल्या.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की स्त्रियांच्या केसेस झाल्या होत्या असे माझ्या लक्षात आले होते आणि त्यानंतर कारवाई झाली होती. मला हे वाटत आहे की आजकाल लव जिहादची प्रकरण खूप भयानक आहे. त्याच्यावर फर्म ॲक्शन आता झाली आहे.आता आपल्या मुलींनाही थोडं अलर्ट राहण जरुरी आहे. आपले संस्कृती फॉलो केले तर असं कधी होऊ शकत नाही. आपल्याला थोडा तिथे लक्ष देणं गरजेचे आहे एज्युकेशन,इंडियन व्हॅल्यूजमध्ये केले तर खूप मोठा फरक पडेल असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles