राजकारणात मोठी खळबळ; आता पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा

केंद्र सरकरने नारीशक्ती वंदन तसेच मतदारसंघांची पुनर्रचना करणारे विधेयक मंजुरीसाठी लोकसभेत आणले होते. परंतु बहुमताअभावी हे विधेयक नामंजूर झाले. विरोधकांनी या विधेयकाचा कडाडून विरोध केला. या विधेयकाच्या माध्यमातून सरकारला महिलांना आरक्षण द्यायचे नाही. महिलांसाठीच्या आरक्षणाचे विधेयक याआधीच मंजूर झालेले आहे. भाजपाला या विधेयकातून सत्तेची भूक भागवायची आहे, असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. तर हे विधेयक नामंजूर झाल्याने काँग्रेस, समाजवादी पक्ष तसेच इतरही विरोधी पक्ष हे महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत, असा दावा विरोधक करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या याच आरोपांवर आता खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत आज मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. नारीशक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याने सत्ताधारी भाजपाने मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. पुण्यातही असाच मोर्चा काढण्यात आला. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. मंत्री पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपद द्या, असं थेट आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.
नारीशक्ती वंदन हे भाजपाचं ढोंग आहे. नारीशक्तीची एवढीच काळजी असेल तर त्यांनी राज्याचे मुख्यमत्रिपद त्यांनी एखाद्या महिला नेत्याला द्यावे. पंकजा मुंडे यांना त्यांनी मुख्यमंत्रिपद द्यावं. केंद्रामध्येही त्यांनी पंतप्रधानपदी महिला नेत्याला बसवावं. असे केल्यास महिलांना आपोआप ताकद मिळेल, असं संजय राऊत म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles