मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेलं आंदोलन ३० मेच्या रात्री १ नंतर मागे घेतलं आहे. तसंच सरकारशी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगेंना हिट स्ट्रोकचा त्रास झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
राधाकृष्ण विखे पाटील ड्राफ्ट घेऊन आले होते. त्यावर दिवसभर चर्चा करण्यात आली. रात्रीही चर्चा करण्यात आली. आम्हाला सांगा आत्ता काही गोष्टी करायच्या असतील तर. पण सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत त्यामुळे त्या अभ्यासकांपुढे मसुदा ठेवला. समाजातले काही लोक होते त्यांनाही दाखवलं. त्यानंतर आम्ही दिलं आहे. सूचना आणि आदेश काढायचे आहेत तर हो म्हटलं आहे. सोमवारपासून सगळं काम सुरु होईल. त्यासाठी महिन्याभरासाठी मुदत दिली आहे. समजा एक महिन्याच्या मुदतीनंतर गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तर आंदोलन करायला मी मोकळा आहे परत. चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला तो असतो हे लक्षात घ्या. सारखं लढावं लागतं तेव्हा गोष्टी मार्गी लागतात. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या मुद्यावरुन सरकारवर टीका केली होती. त्याबाबत प्रश्न विचारला असता विजय वडेट्टीवार यांना मनोज जरांगेंनी खडे बोल सुनावले.
मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता आणि तो संपूर्ण कटाचा “मास्टरमाइंड” होता, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. जरांगे पाटील यांनी दावा केला की मुंडे यांनी आरोपींसोबत बैठका घेतल्या होत्या. बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी हे स्वतःच्या कानांनी ऐकले आहे


