नृत्यांगणा गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेले आहे. तिचा डान्सचा कार्यक्रम पाहण्यासाठी खूप दूरवरून प्रेक्षक येत असतात. अशातच आज कुर्ला फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी जमली होती. अनेकदा कलाकार लोकप्रियतेचा फायदा घेऊन राजकारणात प्रवेश करत असतात. आज गौतमी पाटीलला राजकारणात प्रवेश करणार का याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना गौतमी पाटीलने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात कुर्ल्यातील कार्यक्रमानंतर बोलताना गौतमी पाटीलने म्हटले की, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, मला इतकं प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अनेक अविस्मरणीय अनुभव आहेत. महिला अत्याचार राज्यात वाढत आहेत, नराधमांना फाशी द्यायला हवी, कठोर कारवाई व्हायला पाहिजे. मी स्वत: महिला आहे. आम्हाला फार त्रास होतो असं विधान गौतमीने महिला सुरक्षेच्या प्रश्नावर बोलताना केले आहे.
पुढे बोलताना गौतमीने सांगितले की, ‘मला आख्खा महाराष्ट्र आवडतो, जिथे जाते तिथली होऊन जाते. मुंबई आय लव्ह यू. अजित दादांनी मला खूप मदत केली, आम्ही कधी भेटलो नाही, पण दादांनी मला खुप मदत केली. त्यामुळे दादांची मला खुप आठवण येते. राजकारणात येणार का? या प्रश्नावर बोलताना गौतमीने म्हटले की, ‘मला राजकारणात यायचं नाही, मला फक्त डान्स करायचा आहे. लोकांचं मनोरंजन करायचं आहे.’


