ग्रामपंचायत गैरव्यवहार:1.14 कोटींच्या अपहाराची जबाबदारी निश्चित; सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याकडून वसुली

राजूर ग्रामपंचायत गैरव्यवहार: 1.14 कोटींच्या अपहाराची जबाबदारी निश्चित; सरपंच व अधिकाऱ्याकडून वसुली

अकोले, : तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात विभागीय आयुक्तांनी सरपंच पुष्पा निगळे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे यांच्याकडून प्रत्येकी निम्मी रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. एकूण 1 कोटी 14 लाख 89 हजार 951 रुपयांच्या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

13 महिन्यांपासून चर्चेत असलेले प्रकरण
या प्रकरणाची सुरुवात मे 2025 मध्ये झाली होती. ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेची चौकशी व्हावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष मुर्तडक यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन छेडले होते. आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष चौकशी समिती नियुक्त केली होती.

प्राथमिक ते सखोल तपासणी
प्राथमिक चौकशीत सुमारे 3.72 कोटी रुपयांच्या अनियमिततेबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या सखोल तपासणीत 1 कोटी 14 लाख 89 हजार 951 रुपयांच्या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून वसुलीचे आदेश जारी झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तब्बल 13 महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाच्या निकालामुळे राजूर परिसरासह तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles